Sunday, July 4, 2021

मी एक मतदार ! ( या देशाचा मालक....? )

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . 

तलाठ्यानं सांगितलं .
काम करू पण,
 देणार किती ?
मला वाटलं शेती आमची, 
बाप माझा, 
आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.
पोलीस म्हणाले -
 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .
आमच्या चहा पाण्याचं काय ?

मला पुन्हा राग आला.
यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.

म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,
आमदार म्हटले . . .
 त्याची गडचिरोलीला बदली करू, 
त्याला निलंबित करू,
मंत्र्यांना भेटू पण . . .
वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.

मला वाईट वाटलं.
यांना तर मी मतदान केलं होतं.

वाटलं कोर्टात जाऊ . . .
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की,
तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे. 

तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.
अजून निकाल लागला नव्हता.
शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती. 

म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार, 
लेखक, 
कवीला सांगावं . . .
मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

तिकडे गेलो 
तर सगळेच म्हणाले, 
पेन आमच्या हातात असला तरी,
त्यातली शाई आम्ही विकली आहे.
आम्ही तसं लिहू शकत नाही.
आमचे हात अन . . .
पेन बांधलेले आहेत. 

मला याचा प्रचंड राग आला होता.
म्हणून एका साधू कडे गेलो.
वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.
मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .
उद्या या !

सध्या भाऊसाहेब,
 P I साहेब, 
आमदार साहेब, 
पत्रकार साहेब,
लेखक, 
कवी आले आहेत.
महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, 
नंतर . . .
 त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 
आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.
म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.
लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .
हल्ली काही बरळतोय् !
नंतर कळलं . . .
लोकं गुलाम झाली आहेत !
लाचार झाली आहेत !

क्षणभर वाईट वाटलं.

मी करणार तरी काय होतो.

त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?
कि मारावं यांना . . .
😢 😢

- मी एक मतदार !
( या देशाचा मालक....? )


Wednesday, March 10, 2021

आरोग्यदायी गुरुकिल्ली. (संपदा भंडारकर)

 स्मृतिंच्या गाठोड्यातील आठवणी...... आरोग्यदायी गुरुकिल्ली.

 

प्रत्येक माणसांत चांगुलपणा असतोच पण तो चांगुलपणा उपयोगात आणून जीवन सार्थक बनविणे सोप्पं नसते.आजच्या काळात जरी ही बाब सामान्य वाटत असली तरीही ५०वर्षांपूर्वी अत्यंत दुर्मिळ होतेकिंबहुना अशक्यच होते आणि यालाच अपवाद म्हणजे माझे चुलत काका डॉक्टर विठ्ठल प्रभूडॉक्टरांची माझा संपर्क मी लहान होते तेव्हापासून जरीअसला तरीही त्यांची खरी किमया मला खूप उशिरा जाणवलीकारण त्यांची भेट होत असताना आधी जास्त संवाद झालाच नाही कारण वर्षातून एकदा गणपतीच्या वेळी भेटव्हायचीत्यावेळी फक्त विचारपूस आणि गप्पा गोष्टीत वेळ कसा निघून जायचा ते कळायचेच नाहीगप्पा गोष्टी वडीलधारी माणसांची आणि आम्ही चिल्लर पार्टी आपल्यामस्तीत मग्नचर्चेच्या मधोमध डॉक्टर विठ्ठल प्रभू हे हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला हाक मारून आमच्याशी बोलायचेबाल रोग तज्ञ म्हणून तेव्हा आम्ही त्यांना ओळखायचंमलाआजही

 तो दिवस आठवतो जेव्हा माझ्या आईने आमच्याबद्दल म्हणजेच माझ्या दादा आणि माझ्याबद्दल त्यांच्याशी तक्रार केली की आम्ही

 खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच हट्ट करतोअमुक नकोतमुक नको आणि पालेभाजी तर नकोचडॉक्टर विठ्ठल काकांनी मिश्किलपणे आमच्याकडे पाहून आईला सांगितले कीजबरदस्तीने अन्न भरवू नयेअन्न प्रसन्नचित्त मनाने खाल्ल्यास त्याची पौष्टिकता अधिक कामी येते नाहीतर त्या अन्नाचा आणि त्यातली पौष्टिकता निरर्थक ठरतेत्या घटने नंतरनेहमी मी आतुर असायची काकांच्या भेटीलागणपती बाप्पा ची वाट बघणं एक निमित्त ठरलं काकांची भेटण्यासाठी.

        विठ्ठल प्रभू डॉक्टरांशी संपर्क जसाजसा वाढू लागला तसा तसा बदल मी माझ्यात अनुभवू लागलीप्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला भेटायचंप्रत्येक भेटीतूनसमुपदेशनाचे धडे कानी पडायचेकाका डॉक्टर आहेत हे माहीत होते पण कामजीवन तज्ञ आहेत हे खूप वर्षाने समजलेखूप वर्ष असले तरीही माझ्या जीवनासाठी तीच योग्य वेळहोतीयाचे कारण आमच्या आई-बाबांनी कधीही आमच्याशी उघडपणे चर्चा केलीच नव्हतीबहुतेक त्याकाळी तसेच होते पण विठ्ठल प्रभूंची प्रभावशाली व्याख्याने  ऐकल्या नंतरहळूहळू समजू लागले .तेव्हा हे ही समजले की काही संवेदनशील विषया बाबतीत वाढत्या वयात मुला-मुलींना सारं समजावून सांगणारे डॉक्टर मित्र आम्हाला लाभले आहेतडॉक्टर काकांची एक नवी ओळख माझ्या नजरेसमोर प्रकट होऊ लागलीआम्ही प्रत्यक्ष  भेटून सुद्धा त्यांच्या पुस्तकाद्वारे  समुपदेशनाच्या कार्यशाळेद्वारे  माझ्या आणि असंख्यतरुण-तरुणींच्या विचारात बदल घडत असताना दिसू लागलाजिथे संवेदनशील विषयावर बोलणे म्हणजेच लाज आणि मर्यादा सोडून बोलणे समजलं जायचे तिथेच आता तरुणपिढी बेधडक चर्चा करताना आढळलेज्या घरी पोटच्या पोरीला वयात आल्यावर मासिक पाळी विषयी खबरदारी घेण्याविषयी बोलायला लज्जास्पद समजायचे  त्या मुलींकरिता डॉक्टर विठ्ठल प्रभू हे एक वरदानच ठरलेत्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे मौल्यवान माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीकामजीवनावर पुस्तक लिहिणे त्याकाळी खरच एक अजब कार्यहोते .ते कार्यकर्त्यांना किती अडथळे सामाजिक बंधने शिवीगाळ सोसली असतील .तरीही माघार  घेता पुढे चालतच गेलेमुंबईतल्या दर्जेदार आणि सुप्रसिद्ध कामजीवन विशेषज्ञम्हणून त्यांची  प्रतिमा लोकांसमोर उद्भवू लागली.

       डॉक्टरांनी आपल्या कारकिर्दीत लेखनाद्वारे आणि समुपदेशनाद्वारे रे हे स्पष्ट दाखवून दिले की  आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्धकरण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि तीच जिद्द मला डॉक्टर विठ्ठल प्रभू मध्ये  दिसून आलीही जिद्द होती ती सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचीसमाज म्हणजेचआपण सारे ,आपले विचारआणि वर्तणुकीवर समाजाचा विकास अवलंबून आहेहा विकासजर घडवायचा असेल असेल तर ,डॉक्टर विठ्ठल प्रभू सारखी लोक आणि त्यांच्याविचारसरणी म्हणजेचआधुनिक विचारसरणी ची गरज आजच्या जगाला आहेही गरज समजून घेणाऱ्या लोकांमध्ये हे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचा समावेश आहेत्यांनी समाजालाघडवण्या आधीसमाजाचा विकास ज्यावर अवलंबून आहे ती पिढीम्हणजेच तरुण पिढीत्यांना सशक्त बनवायचे ठरविलेसशक्त बनविले ,ते  ज्ञानाचे शस्त्र हाती देऊन ,कारणत्यांना ते माहीत होते की , हे शस्त्र कधीच निकामी ठरणार नाही .या शास्त्राची चमक नेहमीच राहील .या शस्त्राचा उपयोग पावलोपावली केला जाईलआणि मुख्य म्हणजे हे असेएक मात्र शास्त्र आहे जे दुसऱ्यांच्या हाती  देऊन आपल्याला अपराधीपणाची भावना मनी  येऊ देता,समाज प्रगतिशील बनविण्याच्या कार्यात हातभार  लावल्याचे समाधानी सुख मनी लाभेल.

  डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी असंख्य लोकांना निराशे कडून आशेच्या मार्गावर नेलेतिथे नेतानात्यांच्या मनात असलेल्याअनेक प्रश्नांची उत्तरेत्यांनी स्वतः शोधण्याकरिता ,त्यांनासक्षम बनविलेहे करीत असतानाते मात्र झिजत गेलेस्वतःला आपल्या कामात त्यांनी इतके गुंतून ठेवले होते , की त्यांना स्वतःसाठी विचार करण्यास वेळच मिळत नसेमलातरी असे वाटते की डॉक्टर विठ्ठल प्रभू सारख्या व्यक्तिमत्त्वाचे विचारहे थोर आणि निस्वार्थ भावना चे होते." गंजून संपन्या पेक्षा झिजून संपणे चांगलेअसल्या विचारांचे होतेडॉक्टर विठ्ठल प्रभू.

        या त्यांच्या खडतर जीवन प्रवासात अमूल्य वाटा त्यांच्या पत्नीचा म्हणजेच,  डॉक्टर वीणा विठ्ठल प्रभू यांचा आहेजीवनसाथीअर्धांगिनी या शब्दाचा खरा अर्थफक्तशब्दातच नव्हे , तर कार्याद्वारे त्यांनी दर्शवून दिले .डॉक्टर विणा प्रभू हे  डॉक्टर असल्या कारणीडॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव ,त्यांना होतीते नेहमी डॉक्टर विठ्ठल प्रभूयांच्या बरोबर असायच्यामी भेटायला गेले असताआमच्याबरोबर ते देखील चर्चेत सामील व्हायचे .चहा-नाश्ता अगत्याने आणून समोर ठेवायचे .आमच्या भेटीचे चित्रीकरणकरूनते सवडीच्या वेळी पाहण्यासाठी संग्रहित करायचेहसरा चेहरा डॉक्टरांचा आणि त्यांच्या पत्नीचा ,आजही जेव्हा डोळ्यासमोर येतो डोळ्यात एक चमक आणि मन उत्साहितआणि प्रफुल्लित होतं त्यांच्या आठवणी सलग नजरेसमोर येऊ लागतातया आठवणींचा विसर कधीच  पडण्याजोगी आहे.

      27 फेब्रुवारी 2019 रोजी जेव्हा मला समजले की डॉक्टर विठ्ठल प्रभू आम्हाला सोडून गेले , तेव्हा मनात एक पोकळी निर्माण झाल्याचा भास झालाहा भास नसूनसत्यपरिस्थिती आहे ,हे मनाला पटवून देण्यास ,खूपच कठीण होऊन बसलेमला पोरकं झाल्यासारखं वाटलंत्यांच्याविषयी जितकं सांगावं तितकच कमीलांब असून सुद्धाहाकेच्याअंतरावर असल्याचा भास होत असेमाझी आणि त्यांची शेवटची भेट 20 जानेवारी 2019 रोजी झालीत्या भेटीत सुद्धा माझ्याशी खूप बोलले सगळ्या जुन्या आठवणी ताजीकरीत गेले . मला नेहमी प्रोत्साहन देत , आशेचा किरण दाखवीत ,प्रत्येक कठीण प्रसंगी ,बिनधास्त सामोरे जाण्याची गुरुकिल्ली ते नेहमी  देत असेया एका दुःखातून सावरतअसतानाच  मार्च 2019 रोजी आणखी एक दुखद बातमी कानी पडली .ती म्हणजे डॉक्टर विणा विठ्ठल प्रभू याही आम्हाला सोडून गेल्याइथला प्रवास एकत्र संपून पुढच्याप्रवासाला ही एकत्रच निघालेया दोन्ही थोर व्यक्तींना माझे शतशः प्रणामडॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी आपल्या कारकीर्दीत लिहिलेली पुस्तके  समुपदेशनाचे धडे ,प्रत्येकांच्याजीवनात नक्कीच उपयोगी पडले आहेत,यापुढेही पडतील . ईश्वर चरणी माझी एकच प्रार्थना ,त्यांच्या आत्म्याला शांती लाभोत्यांच्या संपर्कात राहून मला मिळालेली गुरुकिल्लीमी माझ्या ,पुढच्या आयुष्यात त्याचा वापर करून ,माझेच नव्हे ,तर माझ्या संपर्कात आलेल्यांचे हीजीवन सुखमय आणि आनंददायी करेन.

 

डॉक्टरांची ऋणी,

संपदा भंडारकर.