Friday, June 26, 2026

एकटेपणा म्हणजे आनंद की नैराश्य?

 *आगगाडी(Train )हळूहळू स्टेशन/Station(अग्निरथविश्राम धाम) सोडत होती...* 


खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली  एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.


मी सहज विचारलं, "काकू, एकट्याच? भीती नाही वाटत?"


त्या मनापासून हसल्या. अशी हसल्या की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.


त्या म्हणाल्या, "बाळा, भीती तेव्हा वाटायची जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे."


गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक सुंदर जीवनधडा दिला...


त्या म्हणाल्या, "मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या..."


1) नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला "पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं."


२) लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं "मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही."


३) लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला "पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं... आणि आयुष्यात शांतता आली."


४) प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली "सून, नातेवाईक, समाज  सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते."


५) प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं "भाजीत मीठ कमी-जास्त झालं तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते  मी माणूस आहे, देव नाही."


६) प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं "रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते."


७) भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं "उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते."


८) आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं "कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो."


आता काय करते?


"स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते."


खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या 


"पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा... पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं, हे माझ्या हातात असतं."


सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.


समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.


समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.


मनाली स्टेशन जवळ आलं. त्या उतरता उतरता म्हणाल्या 


"तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले... आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे."


"म्हणूनच मी हसते... कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे... आणि माझं शांत, समाधानी मन." 🙏🌿


*जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.*

म्हातारपणी भारतातच का रहावं??

म्हातारपणी भारतातच का रहावं

अमेरिकेला पाच महीने राहिल्यानंतर मनात आलेले विचार सहज पणे लिहावे असं वाटलं
यात कोणाला काही सल्ले देण्याचा हेतू नाही
आमचे पाच महीने मजेत गेले पण कायम परदेशात रहायची वेळ आली तर काय? या संबंधी विचारांच वादळ उठलं.

आमच्या किटी गृपमधे " म्हातारपणी मुलांकडे जाऊन रहावं" असा विचार मांडला गेला. मग परत नटसम्राट हे संपूर्ण नाटक आठवलं. हे नाटक म्हणजे काही फक्त  कल्पना विलास नव्हता

तरूणपणी परदेशात जरूर रहावं. भरपूर पैसे कमवावेत. पण साठी सत्तरीनंतर कुठे रहावं ?

नटसम्राट या नाटकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. या नाटकात तरूण आणि वृद्ध असं द्वंद्व आहे. हे नाटक मी तरूणपणी पाहीलं तेव्हा मला तरूणांचच बरोबर असतं असं वाटलं, आणि आता मी लवकरच 58 होईन तेव्हा पण मला तरूणांचच बरोबर असतं असं आजही वाटतंय. त्यामुळे असा प्रश्न मनात येतो की म्हातारपण काढण्यासाठी कोणता देश चांगला? मी जरी अजून " तसा" म्हातारा झालो नसलो, तरी विचार करून ठेवायला काय हरकत आहे? 


"ते ( 80 वर्षाचे गृहस्थ) अमेरिकेत असतात सध्या त्यांच्या मुलीकडे" हे भारतात ऐकलं की ऐकणार्या भारतीयाला, ते मरण्यापूर्वीच जणू स्वर्गात गेलेत असा फील येतो. " मोठा माणूस ! " असं तो मनात म्हणतो. पण असं खरंच राहिलंय का ?

एक जमाना होता की भारतात लाल गहू मिळायचा आणि मुंबई पुणे एवढ्या अंतरासाठी कधी कधी दहा तास लागायचे
नर्गीसला उपचारासाठी अमेरिकेत जावं लागायचं. आणि पाऊस पडला की अख्ख्या मुंबईत खड्डे पडायचे.
जुन्या काळात या दुर्व्यवस्थेमुळे म्हातारे काय.... तरुणांना पण भारत नकोसा वाटायचा.

पण आता नाही तसं....भारत बदललाय

म्हातारा माणूस म्हणून लागणार्या आणि भारतात असणार्या सुविधांकडे आता आपण बघुया.

दैनंदिन सुविधा

जमाना बदलला. Express ways आले
Foreign च्या गाड्या आल्या. Superspeciality hospitals आली
ओला उबर झोमॅटो स्विगी डंझो अमेझाॅन
झेप्टो गीपे अरबन कंपनी वगैरेनी भारताचा स्वर्ग बनवला आहे. बटन दाबलं की काही क्षणात तुम्हाला आपण ठाकूर असल्याचा भास होतो, आणि गाववाले तुमची सेवा करून लुप्त होतात. अगदी माफक दरात. 
वस्तू नाही आवडली की परत घ्यायला दारात हजर.
अमेरिकेत अजूनही Door delivery नाही. 
असलीच तर फारच महाग असते.
वस्तू आणायला जावी लागते. फर्नीचर स्वतः assemble करावं लागतं. शिवाय वस्तू परत करायची असेल तर गाडी काढून एका विशिष्ट पत्यावर वस्तू देऊन यावी लागते.
तुमची गाडी तुम्हालाच धुवावी लागते, कपड्याना इस्त्री स्वतःच करावी लागते. घराची साफसफाई स्वैपाकानंतरची भांडी तुम्हालाच घासावी लागतात. अगदी एक कप चहा सुद्धा आयता मिळत नाही. तरूण पणी हे ठीक आहे पण म्हातारपणी असं काम होईल का ? तरूण पणी आपण काम करतो कारण म्हातारपणी आराम करता यावा म्हणून. मग आता म्हातारपणी सुद्धा काम काम आणि काम ?


प्रवासी सुविधा 

अमेरिकेची थंडी बघितली आणि वसंत ग्रीष्म हे ॠतू पण बघितले. भारतात 365 दिवसांपैकी 360 दिवस तरी हवा उबदार असते. बाहेर जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक विपदा वगैरे नसते. Occasional driver मागवून, ओला, उबर, रिक्षा वगैरेने सहज प्रवास करता येतो. हे मी खूप वय झालेल्या किंवा  driving न येणार्यांसाठी लिहीत आहे. परदेशात हीच गोष्ट dependency निर्माण करते. बर्याच ठिकाणी public transport नसतो. मग घरात अडकून राहिल्यासारखं वाटू शकतं. प्रचंड थंडी असल्यामुळे घरात कपड्यांचा एक लेयर, घराबाहेर पडताना चार लेयर, परत गाडीत दोन लेयर आणि उतरताना चार लेयर असे सोपस्कार करत बसावं लागत. तरूणपणी याची चटकन सवय होते, पण म्हातारपणी movement स्लो होतात. आणि त्याचा त्रास होतो. थंडीचे सात महिने बाहेर वाॅक वगैरे करता येत नाही.  घरात सोय नसेल तर शरीराला चालतं ठेवण्यासाठी असलेला किमान व्यायाम कसा करणार ? भारतात धुळीने भरलेले रस्ते आहेत, किचाट आहे, गर्दी आहे, घाणेरड्या सवयी असलेले लोक आहेत. पण सगळा भारत काही घाणेरडा नाही...हे सहन करणं शक्य नाही का ? तेवढे एरियाज टाळणं शक्य नाही का ?


आरोग्याच्या तक्रारी 

भारतात X ray, sonography वगैरे OPD सुविधा सहज accessible असतात. त्यासाठी पर Dr वगैरेचं prescription लागत नाही.  पुन्हा त्याचे result normal असतील तर ते लगेच कळतं. " सगळं काही नाॅर्मल आहे" असं तो technician च आपल्याला सांगतो. रिपोर्ट हातात ठेवतो. अमेरिकेत specialist च्या उरावर परत डाॅलर घालून तुम्हाला तुम्ही नाॅर्मल असल्याचं ऐकाव लागतं.


भारतात दर तीन वर्षानी माफक दरात  फुल्ल चेहेकप करता येतो. अमेरिकेत दाढ भरायला कमीत कमी हजार डॉलर खर्च येतो.
यावरून इतर रोगांचा अंदाज करा. कॅनडा यूकेत वगैरे फ्री मेडिकल system आहे । पण आपल्याच भारतियानी ती abuse केली आहे त्यामुळे आता ती अतिशय निकृष्ठ आहे.

साठीनंतर अशी बरीच औषधं जी OTC नसतात पण भारतात ती फार्मसी मधे ओळखीवर मिळतात. भारतात पुन्हा पुन्हा त्याच निदानासाठी आणि prescription साठी स्पेशालिस्ट च्या उरावर शेकडो डाॅलर घालावे लागत नाही. त्यामुळे जीवन सुसह्य होतं. कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की आपल्याला विशेष काही झालेलं नाही. काही औषध केमिस्टकडून आणून पटकन बर होता येतं. याउलट अमेरिकेत तुम्हाला तडफडत रहावं लागतं.
US मधे प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळत नाहीत.
Appointment शिवाय डॉक्टर भेटत नाही
Appointment लगेच मिळत नाही
आणि अगदी मरायला टेकल्याशिवाय emergency मधे घेत नाहीत. औषधं तर प्रचंड महाग अगदी डाॅलर ला रुपया समजलात तरी. परावलंबी झाल्यावर भारतात माणूस ठेवणं जास्त स्वस्त नाही का ?

उदरभरण

भारतात मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे. एकटं असणार्या म्हातार्यांसाठी वेगवेगळे फूड options आहेत. स्वैपाकाला माणूस ठेवण्यापासून डबा आणण्यापर्यंत सोई आहेत. एखाद्या बाईला जरी स्वैपाकाची खूप आवड असली, तरी कधीतरी आयतं जेवायला द्यावं असं वाटतं. अमेरिकेत ते कसं करणार ? घरपोच काही मिळत नाही. घरगुती अन्न आणायचं तरी स्वतः गाडी काढून घ्यायला जावं लागतं

अर्थार्जन

कोणी कितीही उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाला तरी जर developed country मधे उर्वरीत आयुष्य काढायचं असेल तर नोकरी ही करावीच लागते. डबोल्यावर दिवस काढता येत नाहीत. परदेशातील बहुसंख्य देशात आता retirement age 67 ते 69 आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही
मला वाटतं हा एक अमानुष प्रकार आहे. नोकरीमुळे माणसाला जीवनात मोकळा वेळ मिळालेला नसतो. जो रिटायरमेंट नंतर मिळतो. काही माणसं मुश्किलीने सत्तरी गाठतात आणि लुडकतात, मग या लोकानी काय नोकरी करता करताच देह ठेवायचा का ?


एकटेपणा

अमेरिकेत पाचपाचशे घरं असलेल्या कम्युनिटींमधे चिटपाखरू रस्त्यावर दिसत नाही. आज माझ्या नातीला मी खिडकीत उभं राहिलो तरी चालणारी पमपम दाखवू शकत नाही, पक्षी दाखवू शकत नाही, अर्ध्या तासाने एक गाडी येते. एखादा पक्षी दिसतो. अशा ठिकाणी म्हातारा माणूस बोअर होणार नाही का?. माझे सत्तरी पूर्वी खूप अबोल असलेले आजोबा, सत्तरीनंतर खूप बोलू लागले होते. त्यांच्या तरूणपणच्या खूप गोष्टी ते परत परत सांगत असत. पण परदेशात म्हातार्यांना श्रोता कोण ? आणि केवळ मुलं जवळ आहेत म्हणून हा एकटेपणा सहन करायचा का ?
स्पेशल सहायक साठी किती $ मोजायचे ?
बघा विचार करा. 
तुमचे विचार तुम्ही मांडाल अशी अपेक्षा आहे. क्रमशः