Friday, June 26, 2026

एकटेपणा म्हणजे आनंद की नैराश्य?

 *आगगाडी(Train )हळूहळू स्टेशन/Station(अग्निरथविश्राम धाम) सोडत होती...* 


खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली  एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.


मी सहज विचारलं, "काकू, एकट्याच? भीती नाही वाटत?"


त्या मनापासून हसल्या. अशी हसल्या की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.


त्या म्हणाल्या, "बाळा, भीती तेव्हा वाटायची जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे."


गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक सुंदर जीवनधडा दिला...


त्या म्हणाल्या, "मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या..."


1) नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला "पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं."


२) लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं "मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही."


३) लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला "पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं... आणि आयुष्यात शांतता आली."


४) प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली "सून, नातेवाईक, समाज  सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते."


५) प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं "भाजीत मीठ कमी-जास्त झालं तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते  मी माणूस आहे, देव नाही."


६) प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं "रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते."


७) भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं "उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते."


८) आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं "कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो."


आता काय करते?


"स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते."


खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या 


"पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा... पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं, हे माझ्या हातात असतं."


सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.


समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.


समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.


मनाली स्टेशन जवळ आलं. त्या उतरता उतरता म्हणाल्या 


"तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले... आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे."


"म्हणूनच मी हसते... कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे... आणि माझं शांत, समाधानी मन." 🙏🌿


*जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.*

No comments:

Post a Comment